यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी पुरस्कार सोहळा रविवारी: कृषी, साहित्य, उद्योजकता सहसहा क्षेत्रांतील महिलांचा शरद पवार करणार सन्मान – Pune News



यशवंतराव चव्हाण सेंटरचे यशस्विनी सन्मान पुरस्कार वितरण ज्येष्ठ नेते आणि चव्हाण सेंटरचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते येत्या रविवारी (दि.२२) करण्यात येणार आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणाऱ्या या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, प्

.

चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली आहे. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून कृषी, साहित्य, उद्योजकता, सामाजिक, क्रीडा प्रशिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत असलेल्या राज्यातील सहा यशस्विनींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री असताना खासदार शरद पवार यांनी देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात महिला धोरण आणले; आणि २२ जून १९९४ रोजी या धोरणाची अंमलबजावणी केली. या घटनेला २८ वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने २०२२ पासून चव्हाण सेंटरच्या वतीने राज्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार’ सुरु करण्यात आले. महिला धोरणाला यंदा ३१ वर्षे पुर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

स्त्रीकेंद्री आत्मभान जपत मराठी साहित्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या लेखिका श्यामला गरुड (छत्रपती संभाजीनगर) यांना ‘यशस्विनी साहित्य सन्मान’, विघ्नहर्ता महिला ग्रामीण विकास संस्था चालवणाऱ्या पर्यावरणस्नेही मनीषा पवार (गडचिरोली) यांना ‘यशस्विनी कृषी सन्मान’, आदिवासी, दलित, महिला, शेतमजूर, भूमिहीन आदि वंचित व असंघटित श्रमिकांच्या प्रश्नासाठी लढा देणाऱ्या उल्का महाजन (रायगड) यांना ‘यशस्विनी सामाजिक सन्मान’, विविध माध्यमातून आपल्या पत्रकारितेची छाप समाजमनावर उमटवणाऱ्या अलका धुपकर (मुंबई) यांना ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान’, महिलांना सोबत घेऊन शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वीपणे करणाऱ्या कमल कुंभार (धाराशीव) यांना ‘यशस्विनी उद्योजकता सन्मान’ तर कुस्ती या खेळातील निष्णात महिला प्रशिक्षक शबनम शेख (अहिल्यानगर) यांना ‘यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान’ पुरस्कारांनी या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे, असे काकडे यांनी सांगितले. रोख २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

महाराष्ट्र शासनाने संपूर्ण देशभरात प्रथमच १९९४ मध्ये महिला धोरण राबविले. या महिला धोरणाला यंदा ३१ वर्ष पूर्ण होत आहेत. ते औचित्य साधून २२ जून याच तारखेला पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे अंकुश काकडे यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24