‘उंची पेंग्विनची,आवाज कोंबडीचा…’ ठाकरेंच्या टिकेवर राणेंची पहिली प्रतिक्रिया, सर्वच काढलं,’स्वत:चा मुलगा..’


Nitesh Rane On Uddhav Thackeray: शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून एकनाथ शिंदे, नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावर शिंदेच्या शिवसेनेकडून प्रत्युत्तर दिल जातंय. तसेच आता भाजप नेते नितेश राणे यांनीदेखील उद्धव ठाकरेंवर प्रहार केलाय. 

आज आपल्या महाराष्ट्र बंदर खात आणि केंद्रीय शॉप जी मंत्री सोनवळ यांचं मंत्रालय यांच्याशी संयुक्त बैठकीची विनंती केली होती. काही विषय मागे पुढे राहून जातात. म्हणून एकत्र बसून विकासाच्या दृष्टिकोनातून बैठक घेऊ. त्यानुसार महाराष्ट्रात आल्यानंतर महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न जेणेकरून किनारपट्टी अधिक विकसित होऊ शकते. रोजगार निर्मिती व्हावी, असे नितेश राणे म्हणाले.  वाढवण बंदराबरोबरच किनारपट्टीचा विकास कसा होईल,  जहाज बांधणी संदर्भातील पॉलिसी अन्य राज्यात देखील दाखवण्यात येईल. महाराष्ट्रात अशी पॉलिसी तयार करणारं पहील राज्य असेल, असे ते यावेळी म्हणाले.  केंद्रीय मंत्र्यांची सकारात्मक भूमिका आहे. काही परवानग्या उशिरा मिळतात त्यामुळे काही प्रकल्प अर्धवट राहतात. रेल्वे कनेक्टिव्हिटी याविषयी देखील चर्चा झाली. विकासाची दार उघडतील. बंदर खात्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल. वाढवण बंदर रोजगार निर्मिती होईल, असेही ते यावेळी म्हणाले. 

उद्धव ठाकरेंवर प्रहार 

आम्ही जिहादी हृदय सम्राट म्हणतो त्यांना हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिव्या शापच मिळणार, असा प्रहार नितेश राणेंनी केला. बाळासाहेबांच्या मुलाला हिंदुत्वाच काम करत असेल तर खटकणारच.हाच तर बाळासाहेब यांच्या विचारांचा विचार सोडला म्हणून आम्ही बोलतो. यांनी विचार सोडला म्हणूनच यांना ठाकरे ब्रँडची चिंता असल्याचे नितेश राणे म्हणाले. 

आदित्य ठाकरेंवर टिका

स्वतःचा मुलगा कसा आहे हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे मला पेंग्विन बोलून फरक पडत नाही. स्वतःच्या मुलाची अवस्था बघा, असेही ते म्हणाले. दिनो आणि दिशा बद्दल माहिती देत आहोत आम्ही म्हणून टीका केली जाते.स्वतःच्या मुलाच नाईट लाइफ कमी केलं असत  तर हे टाळत आलं असतं.आदित्य ठाकरे यांचा आवाज न बाईचा न माणसाचा. उद्धव ठाकरे यांचा बाप सिल्वर ओक की जन पथला हेच त्यांना माहीत नाही, अशी टीका त्यांनी केली. मुंबईत हिरवे झेंडे दिसणार नाही भगवे दिसणार. वरळी सांभाळता आली नाही आमदारकीला काठावर पास झालेला विद्यार्थी मुंबई लढवणार का? आदित्यला अधिकृत जाहीर करा आम्ही महापौर जाहीर करतो, असे आव्हानही त्यांनी दिले. 

राज-उद्धव एकत्र आले तर?

महा विकास आघाडीची सत्ता असताना स्वतःच्या बापाचं नाव लावायची लाज वाटायची. राहुल गांधी स्टेजवर असताना हिंदू हृदय सम्राट बोलण्याची हिंमत तरी करा. उबाठा वर्धापन दिन इस्लामाबाद मध्ये साजरा झाला पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले. राजकीय धर्मांतर झालं आहे. राजकीय लव्ह जिहाद झाल्याचे उदाहरण उद्धव ठाकरे आहेत. हम दो हमारे दो एवढंच तुम्ही केलं. आम्ही विकास करतोय. टिकेवरुन उद्धव ठाकरे यांची बौद्धिक पातळी कळते, असेही ते म्हणाले.  राज्याच्या हितासाठी ते भांडले नव्हते त्यांचे कौटुंबिक भांडण होती. लग्नामध्ये येतात एकत्र तुम्हाला विचारून येतात का? एका कडे शून्य आमदार आणि एकीकडे 20 आमदार काय होणार? असे म्हणत त्यांनी राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चांवर भाष्य केले. 

संजय राऊतांवर टिका  

ठाकरे ब्रँड मोठा केला तो हिंदुत्वाच्या ताकदीवर मोठा केला. सुपारी उद्धव ठाकरेंनी घेतली. उद्धव ठाकरे टिपू सुलतान आहेत. उद्धव ठाकरे पण अघोरी पूजा करतात. कर्जत फॉर्म हाउसला काय काय पुरल ते सांगू का? धर्मांतर प्रकरण अडीच वर्षात झालं. कोरोना नावाखाली बंद ठेवलं. सुलतान याने जो काही इतिहास रचला तो हिंदूंवर अत्याचार केला तसाच अत्याचार हे उद्धव ठाकरे यांनी केल्याची टिका केली. गोगावले यांनी हिंदू पद्धतीनेच पूजा केली. मग कोणत मोठे संकट आलं? दुसरा धर्म स्वीकारला का? क्रॉस हातात घेऊन वाचले का? असा प्रश्न त्यांनी विचारला.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24